अनन्या:सरत्या वर्षातलं सर्वोत्तम नाटक

2017 मधील शेवटच्या दिवशी गडकरीला अनन्या या नाटकाचा प्रयोग बघता आला.जाहीरातीत गोंधळ होऊनही गडकरीचा प्रयोग हाऊसफुल्ल होता.अनन्या हे नाटक त्याच्या पहिल्या फ्रेम पासून खिळवून ठेवतं.नेपथ्य,प्रकाश योजना आणि संगीत ए क्लास आहे.बासरी या संगीत वाद्याचा नाटकांत अप्रतिम वापर केलाय.ब्लँक आउट चा वापर जुन्या चित्रपटांतील प्रसंगांसारखा केला आहे.त्यामुळे तीन चार बँकड्राँप कँरेक्टर्स सारखे भासतात.
आता नेमकेपणाने कथेवर बोलायचं म्हटलं तर अशा प्रकारच्या कथेचा नाटकाच्या फाँर्म साठी विचार करणं हेच धाडस म्हणायलं हवं आणि हे धाडस सुयोग ने समर्थपणे पेललं आहे.नाटक ही फक्त अनन्याचीच गोष्ट नाही तर तिच्या बाबांची आणि भावाची गोष्ट त्यांत अल्लाद मिसळलेल्या आहेत आणि तरी ही ती अनन्याचीच ,तिच्या जिद्दीचीच गोष्ट आहे.अभिनयाबाबत बोलायचं तर सगळ्यांनीच त्यांच्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत.तरी ही विशेष उल्लेख करावा लागेल तो रूतुजा बागवे आणि प्रमोद पवार सरांचा.रूतूजा बागवे ला एवढ्या कमी वयांत अशी आँथर बँक भूमिका करायला मिळाली आणि तिने त्याचं सोनं केलं आहे.तिने या भूमिकेसाठी घेतलेली प्रचंड मेहनत जाणवते.त्यामुळे तिच्या प्रत्येक सीन्स ला टाळ्यांचा कडकडाट होतो.she deserves it.
मला ते बघताना मधुगंधा कुलकर्णी च्या लाली लिला या नाटकाची आठवण झाली.
प्रमोद पवार सरांचा बाबाचा रोल वेगळाच आहे.त्यांत त्यांच्या भूतकाळाची सावली आहे,दोन मुलांच्या दोन हतबलता आहेत.तो वास्तववादी आहे.अनन्याच्या आयुष्यांत आलेल्या संकटाने तो सामान्य माणसासारखा बावरतो,गाँड बनण्याचा प्रयत्न करत नाही.सरांच्या कारकिर्दीतील ही महत्वाची भूमिका ऩक्कीच आहे.अनन्याच्या अपघातानंतरच्या प्रसंगात तर त्यांनी कमाल केली आहे.कमी संवाद पण फक्त देहबोलीतून तो प्रसंग पेलवला आहे.एकाच वेळी मुलीविषयीचं प्रेम,काळजी आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचं धैर्य नसणं हे सगळं त्यातून आलंय.Hats of.त्यांच्यातला उत्तम अभिनेता पुन्हा पुन्हा प्रसंगात जीव टाकतो.
अनन्या ,पुन्हा एकदा नवरा आणि मुलासोबत बघायचं आहेच.या नाटकाच्या निमित्ताने प्रताप फड य़ा नाटककाराचे आणि दिग्दर्शकाचे आभार मानायला हवेत.वेगळा आणि धाडसी प्रयोग केल्याबद्दल.
Thanks Pramod Pawar sir!
Must watch.
आता नेमकेपणाने कथेवर बोलायचं म्हटलं तर अशा प्रकारच्या कथेचा नाटकाच्या फाँर्म साठी विचार करणं हेच धाडस म्हणायलं हवं आणि हे धाडस सुयोग ने समर्थपणे पेललं आहे.नाटक ही फक्त अनन्याचीच गोष्ट नाही तर तिच्या बाबांची आणि भावाची गोष्ट त्यांत अल्लाद मिसळलेल्या आहेत आणि तरी ही ती अनन्याचीच ,तिच्या जिद्दीचीच गोष्ट आहे.अभिनयाबाबत बोलायचं तर सगळ्यांनीच त्यांच्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत.तरी ही विशेष उल्लेख करावा लागेल तो रूतुजा बागवे आणि प्रमोद पवार सरांचा.रूतूजा बागवे ला एवढ्या कमी वयांत अशी आँथर बँक भूमिका करायला मिळाली आणि तिने त्याचं सोनं केलं आहे.तिने या भूमिकेसाठी घेतलेली प्रचंड मेहनत जाणवते.त्यामुळे तिच्या प्रत्येक सीन्स ला टाळ्यांचा कडकडाट होतो.she deserves it.
मला ते बघताना मधुगंधा कुलकर्णी च्या लाली लिला या नाटकाची आठवण झाली.
प्रमोद पवार सरांचा बाबाचा रोल वेगळाच आहे.त्यांत त्यांच्या भूतकाळाची सावली आहे,दोन मुलांच्या दोन हतबलता आहेत.तो वास्तववादी आहे.अनन्याच्या आयुष्यांत आलेल्या संकटाने तो सामान्य माणसासारखा बावरतो,गाँड बनण्याचा प्रयत्न करत नाही.सरांच्या कारकिर्दीतील ही महत्वाची भूमिका ऩक्कीच आहे.अनन्याच्या अपघातानंतरच्या प्रसंगात तर त्यांनी कमाल केली आहे.कमी संवाद पण फक्त देहबोलीतून तो प्रसंग पेलवला आहे.एकाच वेळी मुलीविषयीचं प्रेम,काळजी आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचं धैर्य नसणं हे सगळं त्यातून आलंय.Hats of.त्यांच्यातला उत्तम अभिनेता पुन्हा पुन्हा प्रसंगात जीव टाकतो.
अनन्या ,पुन्हा एकदा नवरा आणि मुलासोबत बघायचं आहेच.या नाटकाच्या निमित्ताने प्रताप फड य़ा नाटककाराचे आणि दिग्दर्शकाचे आभार मानायला हवेत.वेगळा आणि धाडसी प्रयोग केल्याबद्दल.
Thanks Pramod Pawar sir!
Must watch.
No comments:
Post a Comment